सुविचार



संपादन करा

  • अतिथी देवो भव ॥
  • अपयशाने खचू नका; अधिक जिद्दी व्हा
  • अश्रू येणं हे माणसाला ह्रदय असल्याचं द्योतक आहे.
  • अनुभवासारखा दुसरा गुरू नाही.
  • अत्तर सुगंधी व्हायला फुले सुगंधी असावी लागतात.
  • अति आशा हे दुःखाचं मूळ कारण आहे.
  • अति तिथे माती.
  • अंथरूण बघून पाय पसरा.
  • अतिशहाणा त्याचा बैल रिकामा.
  • अश्रुंनीच ह्र्दये कळतात आणि जुळतात.
  • अन्याय बिनतक्रार सहन कराल तर नविन अन्यायांना उत्तेजन दिल्यासारखे होईल.
  • अज्ञानाची फळे नश्वर असतात, ती सकाळी जन्मतात आणि संध्याकाळी नष्ट होतात.
  • अहंकार आणि लोभ हे माणसाच्या दुःखाचे सर्वात मोठे कारण आहे.
  • अहंकार हे अडानीपणाचे लक्षण आहे.


संपादन करा



  • आयुष्यात भावनेपेक्षा कर्तव्य मोठे असते
  • आपण जे पेरतो तेच उगवतं
  • आयुष्यातला खरा आंनद भावनेच्या ओलाव्यात असतो.
  • आयुष्यात असं काहीतरी मिळवा जे तुमच्या पासून कुणीही चोरून घेऊ शकत नाही.
  • आपण चुकतो तिथे सावरतो तोच खरा मित्र
  • आयुष्यात भेटणारी सगळीच माणसे सारखी नसतात.
  • आपला जन्म होतो तेव्हा आपण रडत असतो आणि लोक हसत असतात. मरताना आपण असं मरावं की आपण हसत असू आणि लोक रडत असतील !
  • आधी विचार करा; मग कृती करा
  • आयुष्यात खूपदा बुध्दी जिंकते; ह्रदय हरतं पण बुध्दी जिंकूनही हरलेली असते आणि ह्रदय हरूनदेखील जिंकलेलं असतं.
  • आपल्यामुळे दुसऱ्याला दु:ख होईल असे कधीही वागू नका
  • आयुष्यत आई आणि वडील यांना कधीच विसरु नका
  • आयुष्य जगून समजते; केवळ ऎकून , वाचून , बघून समजत नाही.
  • आपले सौख्य हे आपल्या विचारांवर अवलंबून असते.
  • आपल्यामुळे दुसऱ्याला दु:ख होईल असे कधीही वागू नका.
  • आयुष्याच्या प्रवासात प्रवास अत्यावश्यक आहे.
  • आपल्याला मदत करणाऱ्या माणसांशी नेहमी कृतज्ञ रहा.
  • आवडतं तेच करू नका; जे करावं लागतं त्यात आवड निर्माण करा.
  • आयुष्यात प्रेम कारा ; पण प्रेमाचं प्रदर्शन करू नका.
  • आयुष्यात कुठलीच नाती ठरवून जोडता येत नाही.
  • आयुष्यात भेटणारी सगळीच माणसे सारखी नसतात.
  • आनंदी मन, सुदृढ शरीर आणि अध्यात्मिक श्रध्दा ह्या तिनही गोष्टी लाभणं म्हणजे अमृत मिळणं.
  • आधी विचार करा, मग कृती करा
  • आयुष्यातल्या कोणत्याही क्षणी क्रोधाचे गुलाम बनू नका.
  • आयुष्यात सर्वात जास्त विश्वास परमेश्वरावर ठेवा.
  • आपल्याला जे आवडतात त्यांच्यावर प्रेम करण्यापेक्षा ज्यानां आपण आवडतो त्यांच्यावर प्रेम करा.
  • आयुष्यात खरं प्रेम, खरी माया फार दुर्मिळ असते.
  • आनंदी मन, सुदृढ शरीर आणि अध्यात्मिक श्रध्दा ह्या तिनही गोष्टी लाभणं म्हणजे अमृत मिळणं.
  • आयुष्यातील प्रत्येक घटनेपासून काहीतरी बोध घेण्यासारखा असतो. पण तशी मनोवृत्ति बाळगली पाहिजे.
  • आपल्या कामात आनंद वाटने हे समृद्धीचे लक्षण आहे.
  • आपण किती गुणी आहोत यापेक्षा आपण किती दोषी आहोत, हे पाहण्यातच मोठेपणा असते.
  • आळस हा माणसाचा खरा शत्रु आहे. 


संपादन करा

  • कसलीच लाज नसणे हीच एक लाजीरवाणी गोष्ट!
  • काही लोक यशाची फक्त स्वप्ने बघतात. इतर लोक जागे होवून ती स्वप्ने पूर्ण होण्यासाठी धडपडतात.
  • क्रांती हळूहळू घडते, एका क्षणात नाही.
  • कविता म्हणजे भावनांचं चित्र!
  • काळ्याकुट्ट रात्रीनंतर सुर्य उगवतोच.
  • केवळ ज्ञान असून उपयोग नाही, ते कसं आणि केव्हा वापरायचं याचंही ज्ञान हवं.
  • काट्याविना गुलाबाचा कोमलपणा व्यर्थ असतो.
  • कधी कधी हक्क मागून मिळत नाहीत. ते मिळवावे लागतात.
  • कुणीही चोरू शकत नाही अशी संपत्ती कमावण्याचा प्रयत्न करा.
  • कामात आनंद निर्माण केला की त्याचं ओझं वाटत नाही.
  • कधी कधी आपण ज्यांच्यावर खूप प्रेम करतो तीच माणसं आपल्यापासून फार दूर जातात.
  • कुठल्याही कामाला अंतःकरणाचा उमाळा लागतो.
  • कलेशिवाय जीवन म्हणजे सुगंधाशिवाय फूल आणि प्राणाशिवाय शरीर
  • काळ्याकुट्ट रात्रीनंतर उद्याची लख्ख पहाट असतेच.
  • काळजाची प्रत्येक जखम भरून येते कारण काळ दुःखावर मायेची फुंकर घालत असतो.
  • केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहीजे.
  • कधीही आशा सोडु नका. आशा हा एक दोर आहे. जो तुम्हांस जीवनात झोके देत असतो.
  • कुणाच्या गुणांची प्रशंसा करण्यात अधिक वेळ दवडण्यापेक्षा त्यांच्यातले गुण आत्मसात करण्याचा प्रयत्न करा.
  • क्रोधाला लगाम घालण्यासाठी मनाइतक उत्तम उपाय नाही.
  • कालच्या व्यर्थ विचारांना, मनोभावनांना, व कर्मांना पूर्णविराम द्या म्हणजे त्याचा अंशमात्र उरणार नाही.
  • क्रोधाच्या सिंहासनावर बसताच बुद्धि तेथून निघुन जाते.
  • क्रोध म्हणजे मधमाशीच्या पोळ्यावर फेकलेले दगड.
  • केलेली मदत कधीही वाया जात नाही.